Friday, July 3, 2009

खवय्येगिरी

मित्रांनो, तुमच्यापैकी कित्येक जण उत्तम खवय्ये असतील. (विसरलात का, "मीसुद्धातुमच्यातलाच एक".)

पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना नांदेडमधली खाण्या/पीण्यासाठी प्रसिद्ध असलेली काही विशिष्टठिकाणंच माहित असतात जसे की आईनाथची पाणीपुरी.

कुणालाही प्रश्न विचारला की तुला नांदेडमधले खाण्यासाठी काय आवडते तर त्याचे उत्तर तयारआईनाथची पाणीपुरी’! मग भलेही त्याने तीथली पाणीपुरी कधीतरी एकदाच खाल्लेली असेल.

अशाच अनुभवांवरून मला हा टॉपिक काढण्याचे सुचले.

मग काय, माझ्या मित्रांना पकडून मी काही प्रश्न विचारले :-

१) तुमच्या मते नांदेडमधील खाण्या-पिण्यासाठीची बेस्ट जागा कोणती ? (हॉटेल, हातगाडा इत्यादी.)

२) तुम्ही तीथे सामान्यतः काय ऑर्डर करता ?

३) त्या ठिकाणाची स्पेशालिटी काय आहे ? (किंमत, चव, क्वांटीटी, उपलब्धता इ.)

माझ्या मित्रांनी दिलेली उत्तरं मी आता इथे पोस्ट करतो.

बी.सी.. करणारा राजदीप रायेवार म्हणतो की त्याला भाग्यनगरच्या आईनाथची पाणीपुरी आणि पावभाजी फार आवडते. स्पेशालिटीम्हणजे तीथला प्रत्येक पदार्थ हा स्वस्त आणि मस्त असतो असे त्याचे म्हणने आहे.

मुळचा नांदेडचा पण सध्या पुण्यात आदेश गट्टाणीला आय.टी.आय. कॉर्नरजवळील गोदावरी स्वीट्स मधील स्नॅक्स फार आवडतात आणि जेवणासाठी तो गोपीरुचीरा फॅमिली रेस्टॉरेंटला प्राधान्यदेतो. तो सांगतो की गोदावरी स्वीट्स हे थोडेसे महाग असले तरीत्यांच्या अन्नपदार्थाच्या दर्जामुळे इट्स .के.

निशिगंध, ज्याचे नांदेडच्याच एस.जी.जी.एस. कॉलेजमधून एम.टेक. (CAD/CAM) झाले आहे, तो म्हणतो की जुन्या मोढ्यातील सुंधा भवानी हॉटेल त्याला फार आवडते. त्याच्या मते तेथील दालबाटी चुरमा (कडक घी के साथ) निव्वळ अप्रतीम असते.



मीसुद्धा एक चांगला खवय्या असल्यामुळे मला आवडणाऱ्या ठिकाणांचीसुद्धा माहिती देतो.




चिकन
आणि मटनाचे खाद्यपदार्थ
--> हॉटेल सुंदर (गुरूद्वाऱ्याजवळ), मराठा मटन (दत्तनगर).

हॉटेल सुंदर हे अतिशय स्वस्त आणि चवीलाही मस्त असे हॉटेल आहे. मराठा मटन हॉटेलातला मटणाचा झणझणीत रस्सा तर लाजवाबच, पण हे बिअर बारसुद्धा असल्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमीलीला इथे नेऊ इच्छीणार नाही.



दही भल्ला --> गुरूद्वारा चौक

गुरूद्वारा चौकाजवळच असलेल्या ह्या हातगाड्यावर दही भल्ला आणि पाणीपुरी फार मस्त मिळते. मला तरी बुवा इथली पाणीपुरी आईनाथच्या पाणीपुरीपेक्षा चवीला जास्त चांगली वाटते.



व्हेज मंचुरीअन --> आदित्य स्नॅक्स. (बोरबन भागात)

१२ रुपयाला एक प्लेट व्हेज. मंचुरीअन.

आहे की नाही किंमत आश्चर्यचकीत करणारी. अहो चवसुद्धा तीतकीच चांगली आहे.

मंचुरीअन व्यतिरीक्त इथले फ्राईड राईस, नुडल्स, पनीर ६५ हे पदार्थही चवीला चांगले आहेत.



रोज(गुलाब) लस्सी --> जनता कोल्ड्रींक्स (वजिराबाद)

या लस्सीसाठी अमृततूल्य हा एकच शब्द माझ्यापाशी आहे. इथे येणारे अर्ध्याहून जास्त ग्राहक याच लस्सीची मागणी करताना दिसतात.



खीचडी --> कविता खिचडी सेंटर (बाफना)

बाफना/देगलूर नाका भागात काम करणारे मजूरच नाही तर नांदेडच्या वेगवेगळ्या भागातून लोक इथली खीचडी आणि भज्जे खायला येतात.



जेवणासाठी --> शेर-ए-पंजाब आणि दशमेश

हे दोन्ही ढाबे थोडीशी शहराबाहेर, आसना नदीच्या पूलापुढे आहेत.

दोन्ही हॉटेलं फक्त नावालाच ढाबे आहेत. बाकी चव, स्वच्छता, सजावट या सर्व बाबतीत नांदेड शहरातले हॉटेल्ससुद्धा यांच्यापुढे फीके पडतील.




ही तर झाली शहरातली ठिकाणं, शहराबाहेरही खाण्या-पीण्याची अनेक ठिकाणे प्रसिद्धआहेत. लोह्याचे दही धपाटे, भोकरच्या बसस्टॅंडवरचे खिचडी-भज्जे, महादेव पिंपळगावचे पेढे, किनवट येथील इसाक खान यांचा ढाबा अशी बरीच ज्ञात-अज्ञात ठिकाणं नांदेडला खाण्यापीण्याच्याबाबतीत समृद्ध करतात.



एकंदरीत खवय्येगिरी करणाऱ्या नांदेडीअन्सच्या जिभेची वासना कधिही कमी होणार नाही असे आपण म्हणू शकतो.



तुम्हालाही जर नांदेडमधल्या कुठल्या ठिकाणचा खाद्यपदार्थ आवडत असेल तर त्याची माहितीआमच्यासोबत शेअर करावी, जेणेकरून आम्हाला त्या पदार्थाचा आनंद घेता येईल.

अखेरकार खानेवालों को खाने का बहाना चाहिये !

Sunday, June 28, 2009

पाऊस आला

आज खऱ्या अर्थाने मान्सून आला असे वाटत आहे.
काल रात्री वाजल्यापासून पावसाने जो जोर पकडला आहे तो अजूनही कायम आहे.
हा ब्लॉगपोस्ट लिहीत असतांनाच (सकाळचे ११.००) बाहेर अजूनही मस्त पाऊस पडत आहे.
वातावरणात गारवा निर्माण झाला आहे त्यामुळे एव्हाणा तुम्ही चहा पीत पीत बाहेरच्या वातावरणाचा आनंद लुटतअसाल.
रवीवार असल्यामुळे आज नेहमीच्या धावपळीपासूनही सुटका झालेली असेल.

बाहेर पडून पावसाचा आनंद लुटायचा की नाही हे मात्र सर्वस्वी तुमच्याच हाती आहे.
चलाअ, मी एक कविता पोस्ट करतो, ती वाचल्यावर मग तुम्ही स्वतःला पावसात नाचण्या-बागडण्यापासून रोखूचशकणार नाही.

रिपरिप येतो मनि तरंगतो आनंदाचे गाणे
रंग येऊन पानोपानि स्मरवितो तराणे
पाऊस आला, पाऊस आला, पाऊस आला.

बालपणाच्या आठवणी घेऊन तो येतो
पाण्यातल्या होड्या नि गाणि तो गातो
वारा पण अलगद डोलु लागतो
हिरवा निसर्ग सारा ओलागार होतो
पाऊस आला, पाऊस आला, पाऊस आला.

मित्र तो, सखा तो, हळवार येतो
मन प्रसन्न करुन तो आनंद देतो
गरम चहाचा स्वाद तो वेगळाच देतो
खिडकित बघताना तो डाळे टिपुन घेतो
हाताच्या बोटावर तो आपला नाच करतो
पाऊस आला, पाऊस आला, पाऊस आला.

-- राहूल पाठक

Thursday, June 25, 2009

दहावीचा निकाल

सर्व दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन !
जे उत्तीर्ण झाले नाहीत त्यांनी खचून जाता पुन्हा एकदा जोमाने कामाला लागावे.



निकाल पाहण्यासाठी खालील संकेतस्थळाचा उपयोग करावा.
http://mahresult.nic.in/ssc2009/ssc09.htm


Monday, June 22, 2009

दैनिक सत्यप्रभा आता इंटरनेटवर

नमस्कार मित्रांनो,
नांदेडच्या 'दैनिक सत्यप्रभा' या वृत्तपत्राची आवृत्ती आता इंटरनेटवरही उपलब्ध झाली आहे.
आणि अशा प्रकारे नांदेडच्या स्थानिक वृत्तपत्राची आवृत्ती सर्वप्रथम इंटरनेटवर आणण्याचा बहुमानदेखील दैनिक सत्यप्रभानेच पटकावीला आहे. :-)

साईटवरच्या काही सुविधा अजून पुर्णपणे कार्यान्वीत झाल्या नसल्या तरी लवकरच त्या सुरळीत होतील आणि तुम्हाला त्यांचा फायदा घेता येईल अशी आशा करूयात.

दैनिक सत्यप्रभाच्या भावी वाटचालीस 'नांदेडीअन्सतर्फे' हार्दिक शुभेच्छा !


:: Link ::
http://satyaprabha.com/



Friday, June 5, 2009

ती फाईटर प्लेन्स आता नांदेडात

तामसा आणि भोकर परिसरात घिरट्या घालणाऱ्या "त्या" विमानांबद्दल आपण अगोदरच वाचलं असेल.
मित्रांनो, तीच विमानं आता गेल्या दोन दिवसांपासून नांदेड शहरावर घिरट्या घालीत आहेत.
अगदी कमी उंचीवरून, प्रचंड आवाज करीत आणि अतिशय वेगाने ही विमानं नांदेड शहरावरून उड्डाण घेत आहेत.



नांदेडीअन्स अशी विमानं नांदेडमध्ये पहिल्यांदाच पाहात आहेत त्यामुळे साहजिकच प्रत्येकाच्या मनातवेगवेगळ्या शंका - कुशंका निर्माण होत आहेत की ही विमानं नांदेडमध्ये कशासाठी, इतक्या खालून उडण्यामागेत्यांचे प्रयोजन काय, वगैरे वगैरे.
अजूनपर्यंत कोणत्याही वृत्तवाहिनीने किंवा वृत्तपत्राने याबाबत कोणतीच माहिती जाहीर केली नसल्यामुळे यातर्क-वितर्कांना अजून उधानच येत आहे.
स्विकृतदर्शनी ही विमानं दिसायला भारतीय वायुसेनेत कार्यरत असलेल्या "हॉक" विमानांसारखीच दिसत आहेत.



आपणा सर्वांना तर माहितच आहे की बिदर (कर्नाटकातील एक जिल्हा) येथे भारतीय वायुसेनेचे तळ आहे.
माझ्या माहितीप्रमाणे साधारणतः वर्षभरापुर्वी आपल्या वायुसेनेने काही "हॉक" विमानं विकत घेतली होती आणिती विमानं बिदर येथेच कार्यरत आहेत. (माझी माहिती बरोबरच असेल याची काही शाश्वती नाही.)
असा अंदाज बांधायला काही हरकत नाही की ही विमानं "हॉक" असतील आणि ती नांदेड येथे काही सराव करतअसतील.
पण हा सर्वस्वी एक अंदाजच आहे, ऑफिशीयल माहिती मिळेपर्यंत आपण काहीच सांगू शकत नाही.


:: Photos ::



ता.क. :- या साईटवरील चित्रं आणि माहिती पाहून ही विमानं "British Aerospace Hawk 132 ZK122" आहेत असे दिसून येते.

http://www.airplane-pictures.net/image31781.html

Wednesday, June 3, 2009

लातुरच्या राजस्थान विद्यालयात तोडफोड

अहो, लातुरचा उल्लेख असला म्हणून काय झालं, नांदेडशीच संबंधित आहे ही बातमी.

अरे नाही, कोणत्या राजकीय वादातून नाही झाली ही तोडफोड.
अहो तुम्हाला तर माहितच आहे ना, आपल्या मुखेड तालुक्यातील १२वीच्या परिक्षेतील सामुहिक कॉपी प्रकरण!
तेच ते, ज्यात सुरूवातीला लातुर बोर्डाने फक्त १६० परिक्षार्थ्यांनाच चौकशीकरीता बोलाविलं होतं पण नंतर अधिक चौकशीनंतर विद्यार्थ्यांची हीच संख्या ३,००० पर्यंत पोहोचली.

उद्या महाराष्ट्रात सगळीकडे १२ वीचा निकाल लागेल, पण मुखेडच्या या ३,००० विद्यार्थ्यांना मात्र निकालासाठी अजून बरीच वाट पाहावी लागण्याचे चिन्हं दिसत आहेत कारण लातुर बोर्डाने या सर्वच्या सर्व ३,००० विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवला आहे.



याच विद्यार्थ्यांच्या संतापाचा फटका आज दुपारी लातुर येथील राजस्थान विद्यालयाला बसला.
विद्यार्थ्यांनी परिसरात जोरदार घोषणाबाजी करत तोडफोड केली, तसेच पोलिसांनी विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी केलेल्या सौम्य लाठीमारात एका पत्रकाराचा कॅमेराही फुटला त्यामुळे स्थानिक पत्रकारांनी एकत्र येऊन पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली.



या विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉफी केल्याचा आरोप महाविद्यालय आणि मंडळाचा असून, विद्यार्थ्यांनी मात्र या वृत्ताचा इन्कार केला आहे. महाविद्यालयाने जाणून-बुजून निकाल राखीव ठेवले असून, हे निकाल जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली आहे.



बघुयात पुढे हे प्रकरण काय वळण घेते.

या बातमीच्या अपडेट वेळोवेळी पोस्ट करण्यात येतील.




ता. . :- (
मंगळवार ४ जून, ९:३० AM)
आमचे मित्र सौरभ कौरवार यांनी आम्हाला हा व्हिडीओ पाठविला आहे.
हा व्हिडीओ त्यांनी स्वतःच्या मोबाईलमधून शूट केला आहे.
काल जेव्हा तोडफोड झाली, तेव्हा सौरभ कौरवार हा राजस्थान विद्यालयातच होता.


व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Tuesday, June 2, 2009

आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानक पाहण्याची आज सुवर्णसंधी

सकाळ वृत्तसेवा
Monday, June 01st, 2009 AT 11:06 PM


नांदेड - अंतराळातील आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानक अगदी साध्या डोळ्यांनी पाहण्याचा सुवर्णयोग नांदेडकरांच्या वाट्याला आला आहे. मंगळवारी (ता. दोन) सायंकाळी ०७.३४, ०७.३९ व ०७.४१ या तीन वेळी हे स्थानक नांदेडच्या उत्तर पश्‍चिम आकाशातून साध्या डोळ्यांनीही स्पष्ट दिसेल. अंतराळप्रेमींनी ही संधी गमावू नये, असे आवाहन महात्मा गांधी मिशनच्या अंतराळ व खगोलशास्त्र तंत्रशाळेचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी केले आहे.
आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानक दरदिवशी पृथ्वीला जवळपास १६ प्रदक्षिणा घालते. मात्र, काही विशिष्ट दिवशीच आपल्याला आपल्या स्थानिक ठिकाणाहून हे अंतराळस्थानक पाहता येणे शक्‍य आहे.
मंगळवारी ही संधी उपलब्ध होणार असून आकाश जर निरभ्र असेल तर साध्या डोळ्यांनीही ते पाहता येईल.
या स्थानकाला जोडलेल्या उपकरणांवर सूर्यप्रकाश पडल्याने ते प्रकाशमान होणार असून या वेळी त्याची तेजस्विता एखाद्या ताऱ्याप्रमाणे (उणे १.२) भासेल.

आकाशातील उत्तर ध्रुवाजवळून सप्तर्षी तारकासमूह, भुतक मार्ग, वृश्‍चिक तारकासमूहाकडे, असा या अंतराळ स्थानकाचा मार्ग असेल. भुतकजवळ असताना ते अगदी स्पष्टपणे ओळखता येईल. या वेळी उत्तर क्षितीजावरून जवळपास ३७ अंश उंचीवर ते दिसणार आहे.
१९९८ मध्ये अंतराळात पाठवलेले हे स्थानक २०११ पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होईल, तेव्हा ते आतापर्यंत अंतराळात पाठवलेले सर्वांत मोठे स्थानक असेल. तेव्हा ते फुटबॉलच्या मैदानापेक्षाही मोठे असेल. जगभरातील सोळा देशांनी एकत्र येऊन हा प्रकल्प राबविला आहे.
या स्थानकाचे पृथ्वीजवळ असतानाचे अंतर ३५० किलोमीटर एवढे असते. तेव्हा ते साध्या डोळ्यांनी पाहणे शक्‍य आहे. तासाला २७ हजार ७२४ किलोमीटर एवढ्या प्रचंड वेगाने ते पृथ्वीला प्रदक्षिणा घालते; म्हणजे ९१ मिनिटांत एक प्रदक्षिणा पूर्ण होते.

पृथ्वीवरील गुरत्वीय बदलामुळे येथे करता न येणारे प्रयोग या अंतराळ स्थानकात करण्यात येतात. वजन विरहीत अवस्थेमध्ये मनुष्याचे वास्तव्य किती दिवस वाढवता येईल, जेणेकरून मंगळावरील मोहिमेसाठी माणूस पाठवता येईल, याचा अभ्यास केला जात आहे.

मूळ अंतराळस्थानकाला आतापर्यंत १४ वेगवेगळ्या उपकरणांनी जोडलेले आहे. या अंतराळ स्थानकात आजवर भारतीय वंशाच्या कल्पना चावला व त्यानंतर सुनीता विल्यम्स यांनी काम केले आहे. कल्पना चावला यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर सुनीता विल्यम्स यांनी सलग सहा महिने या स्थानकात वास्तव्य करण्याचा विक्रम केला आहे, असेही श्री. औंधकर यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.



Monday, June 1, 2009

हिंगोली गेट उड्डाणपुल

मित्रांनो, काल (रविवार, ३१ मे २००९ रोजी) शहरातील हिंगोली गेट परीसरातील उड्डाणपुलाची दुसरी बाजूसुद्धा वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे.
यामुळे शहरातील वाहतुकीची समस्या निश्चितच थोड्याफार प्रमाणात का होईना पण कमी होईल.

याबद्दल आपले काय मत आहे ?